सरकार्यवाह
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरसंघचालक व सरकार्यवाह
ही दोन अत्युच्च पदे आहेत. त्यातील पहिले पद हे ‘मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शकाचे’ आहे तर दुसरे पद हे ‘कार्यकारी’ आहे. सरसंघचालक हा जर संघाचा चेहरा असेल तर सरकार्यवाह हा चेहरा सोडून सर्व काही आहे. सर्वसाधारणपणे संघाच्या दैनंदिन कामकाजात सरसंघचालक लक्ष घालत नाहीत.
आपल्या सोबतीच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या मदतीने सरकार्यवाह संघाचे दैनंदिन कामकाज
पाहतात. संघाची रचना व
कार्यपद्धती हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पण संघाच्या रचनेत व
कार्यपद्धतीत बदल किंवा सुधारणा करण्याचे अधिकार सरकार्यवाहांना असतात. सरकार्यवाह झाल्यानंतर सरसंघचालक बनण्याचे भाग्य गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब
देवरस, रज्जूभैय्या व डॉ. मोहनराव भागवतांना लाभले आहे.
संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक प्रतिवर्षी साधारणपणे मार्चच्या
दुसऱ्या वा तिसऱ्या आठवड्यात बोलावली जाते. या बैठकीत सुमारे १,४०० प्रतिनिधी उपस्थित रहातात. दर ३ वर्षांनी या बैठकीत ‘जिल्हा’, ‘विभाग’
व ‘प्रांत’ संघचालक निवडले जातात. यानंतर, बैठकीच्या
अंतिम दिनी ‘सरकार्यवाह’ या
पदासाठी संघस्वयंसेवकांची नियुक्ती व्हावी यासाठी सर्वांची सहमती होण्यासाठी चर्चा
केली जाते. सर्वसहमती म्हणजेच एकमत न झाल्यास लोकशाही पद्धतीने निवडणूक घेतली जाते. या निवडणुकीत केंद्रीय प्रतिनिधी मतदार
असतात. निवडणूक अधिकारी सरकार्यवाह पदाच्या निवडीची घोषणा करतात व प्रतिनिधी सभा ॐ
शब्द उच्चारून व हात उंचावून त्याला अनुमोदन देते.
आद्य सरकार्यवाह होण्याचा बहुमान १९२९ साली बाळाजी हुद्दार
यांना मिळाला. संघाचे ते पहिले सरकार्यवाह तर २०२१
साली सरकार्यवाह पदावर नियुक्त झालेले दत्तात्रेय होसबाळे हे
सद्य सरकार्यवाह. दत्तात्रेयजींना त्यांच्या
पूर्वसूरींची एक प्रदीर्घ व उज्ज्वल परंपरा लाभली आहे. १९३९ ला गोळवलकर गुरुजी, १९५० साली
भैय्याजी दाणी, १९५६ ला एकनाथजी रानडे,
१९६९ ला बाळासाहेब देवरस, १९७३ ला माधवराव मुळे, १९७८ ला प्रो. राजेंद्र सिंह उपाख्य राज्जूभैय्या, १९८७ ला हो. वे. शेषाद्री जी, २००० साली डॉ. मोहनराव भागवत व २००९ ला
सुरेश उपाख्य भैय्याजी जोशी यांनी सरकार्यवाह पदाची जबाबदारी खांद्यावर घेतली होती
व या सर्वांनी ती अतिशय उत्तमपणे पार पाडली.
संघाची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले व २०२१ साली सरकार्यवाह पदावर नियुक्त झालेले सद्य सरकार्यवाह
दत्तात्रेय होसबाळे हे ६० वर्षांचे असून ते मूळचे कर्नाटकामधील होसबाळे या गावचे आहेत.
वयाच्या अवघ्या १४ व्या
वर्षापासून ते संघाशी जोडले गेले व त्यानंतर संघाच्या विद्यार्थी शाखेत म्हणजेच ‘अभाविप’
मध्ये ते काम करू लागले १९९२ ते २००३ या अकरा वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात ते ‘अभाविप’ चे
अखिल भारतीय संघटन महामंत्री म्हणून कार्यरत होते.
सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे हे इंग्रजी या विषयात बंगलुरु विश्वविद्यालयातील
पदव्युत्तर पदवीधारक असून समाजातील प्रबुद्ध वर्गाला संघाकडे
आकर्षित करून त्यांना संघाशी जोडण्याचे मोठेच काम त्यांनी केले आहे. विद्यार्थी नेता असताना व ‘अभाविप’ चे
काम पाहत असताना १९७५ साली लागलेल्या आणीबाणीत त्यांना राष्ट्रीय सुरक्षा
कायद्याखाली अटक करण्यात आली होती व तुरुंगातही जावे लागले होते.
संघाकडे उच्च शिक्षित तरुणांचा प्रचंड ओढा आहे. उच्च शिक्षित डॉक्टर, इंजीनियर, चार्टर्ड अकाऊंटंट,
आर्किटेक्ट, व्यवस्थापन तज्ञ तसेच डॉक्टरेट केलेले संशोधक
अगदी तरुणपणी पूर्णवेळ संघकार्याला वाहून घेतात. शेवटी याच तरुणाई मधून संघाच भावी
नेतृत्व आकाराला येते. त्यामुळेच की काय, संघाचे
नेतृत्व करणारे सर्वच सरसंघचालक व सरकार्यवाह हे उच्च शिक्षित होते/आहेत.
विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्र सेविका
समिति, वनवासी कल्याण आश्रम, भारतीय
किसान संघ, भारतीय रेल श्रमिक संघ, अधिवक्ता
परिषद, शिक्षक संघ,
स्वदेशी जागरण मंच, ग्राहक पंचायत,
लघु उद्योग भारती, सहकार भारती, सेवा भारती, लोक भारती, संस्कार
भारती, संस्कृत भारती, क्रीड़ा भारती,
विद्या भारती, विज्ञान भारती, दीनदयाल शोध संस्थान, भारत विकास परिषद, विवेकानंद चिकित्सा मिशन, दुर्गा वाहिनी, मुस्लिम राष्ट्रीय मंच,
एकल विद्यालय, सरस्वती शिशु मंदिर, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी
सारख्या स्वतंत्रपणे चालवल्या जाणाऱ्या अनेक संस्था व संघटना तसेच ‘पांचजन्य’ व ‘हिंदी विवेक’ ही हिंदी, ‘ऑर्गनायझर’ हे इंग्रजी, ‘तरुण भारत’ व ‘विवेक’ ही मराठी व यासारखी विविध भाषांमधे प्रकाशित
होणारी अनेक नियतकालिके, संघाशी, काही औपचारिकरित्या तर काही अनौपचारिकरित्या संबंधीत आहेत.
या संस्था/ संघटनांच्या विचारांचा धागा समान असल्यामुळे
अश्या अनेक संस्था व संघटनांचे पालकत्व सरकार्यवाह असलेल्या व्यक्तीकडे असते.
त्यांना त्यांच्या अडचणीच्या वेळी मदत करणे, मार्गदर्शन करणे तर काही प्रसंगी आवश्यक
असेल तर बैठका घेऊन त्यावर मार्ग काढण्याचे काम सरकार्यवाह करत असतात.
करोडो स्वयंसेवक, ५०
हजारांहून अधिक शाखा, हजारो पूर्णकालीन प्रचारक व पदाधिकारी, हजारांच्या
संख्येत देशभरात चाललेली विविध विषयांतील सेवा कार्ये, शेकडोंच्या
संख्येने असलेली कार्यालये व त्यांच्या आस्थापने संबंधीच्या समस्या, कर्मचारी
वर्ग यांचे प्रशासन पाहणे हे कोणत्याही बहुराष्ट्रीय
कंपनीचा कारभार चालवण्याहून अधिक मोठे, कठीण
व जबाबदारीचे काम आहे.
संघाच्या कार्यपद्धतीत सरकार्यवाहांना सहाय्य करण्यासाठी सहसरकार्यवाह
नेमण्याची पद्धत आहे. सध्या अतुल लिमये, कृष्ण गोपाळ, सी. आर. मुकुंद, अरुण कुमार,
राम दत्त चक्रधर, व अलोक कुमार हे सहा जण सहसरकार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच
बौद्धिक, शारीरिक, घोष, प्रचार आदी विविध विषय हाताळायला अखिल भारतीय स्तरावर प्रमूख नेमले
जातात. कारभाराच्या सोयीच्या दृष्टीने देशभरात तयार केलेल्या विविध प्रांतात
प्रवास करून तेथील संघ पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणे व त्यांना मार्गदर्शन करणे हे
सरकार्यवाहांकडून अपेक्षित असते.
संघातर्फे प्रतीवर्षी प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष व
तृतीय वर्ष शिक्षणाचे निवासी वर्ग आयोजित केले जातात. हे कॅम्प साधारणपणे १
महिन्याच्या अवधीचे असतात. त्याचबरोबर प्रांतिक स्तरावर एका आठवड्याचे नव्या
स्वयंसेवकांसाठी प्राथमिक निवासी कॅम्प भरविले जातात. प्रतिवर्षी लाखोंच्या संख्येत यात उपस्थिती
असते. या सर्व प्रशिक्षण वर्गाची अंतिम जबाबदारी सरकार्यवाहांची असते.
त्याच्या जोडीला अनेक वेळा
सरकार्यवाह हे सरसंघचालकांचे दूत म्हणून अतिमहत्वाच्या पदावरील व्यक्तीच्या भेटीला
जातात ज्यात अतिशय महत्वाच्या व गोपनीय विषयांवर चर्चा होते. एकदा सद्य सरसंघचालक
म्हणाले होते की “मी संघाचा सामान्य स्वयंसेवक असून माननीय सरकार्यवाहांच्या
आज्ञेनुसार काम करतो“ यावरुन सरकार्यवाह या पदाचे संघातील महत्व अधोरेखित होते.
साहेब संघाच्या संरचनेची विस्तृत माहीती माझ्यासह अनेकांना नसते, आपल्या लेखातून 'सरकार्यवाह 'या पदाची माहिती मिळाली, धन्यवाद गोपीनाथ बापट
उत्तर द्याहटवाहेच लक्षात ठेवून व संघाच्या शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संघ स्थापने पासून सुरुवात करून गेल्या १०० वर्षाचा संघाचा इतिहास थोडक्यात लोकांपुढे मांडावा ही कल्पना सुचली. त्यामुळे जयोस्तुते या लेखमालेचा जन्म झाला. आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद
हटवाBrief, concise and informative. Hope it also turns out motivational.
उत्तर द्याहटवाOne observation from above is that, does RSS has any activity dedicated to ex servicemen. I believe they are well trained in various aspects of life skills particularly for disaster management.
उत्तर द्याहटवाI have already sent you the link of an organization which is working for Ex Servicemen. Please do visit
उत्तर द्याहटवा